जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 'वाहन सेवा' अचानक थांबली!राष्ट्रीय कार्यक्रमात अडथळा.
जळगाव , (प्रतिनिधी)- जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत पुरविण्यात येणारी 45 वाहनांची 'वाहन सेवा' गेल्या पंधरा दिवसा पासून अचानक थांबली असल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी व शालेय आरोग्य तपासणीचे कामकाज पूर्णतः बंद पडल्यानं आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित, नाशिक यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दि.22 डिसेंबर रोजी पत्र काढून सेवा सुरु करण्याबाबत निर्देश दिले व अहवाल सादर करण्याचं सांगितलं आहे. जिल्ह्यातील 46 पथकांचं काम थांबलं राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम नुसार जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत एकूण 46 आरबीएसके पथके कार्यरत केले आहे.46 पैकी 45 पथकांना वाहने पुरविण्यात आलेली आहे. सदर वाहने ही दि.14 डिसेंबर पासून उपलब्ध झालेली नाही.यामुळे आरोग्य तपासणी करणेस अडथळा निर्माण झाला आहे.यामुळे जिल्ह्यातील 46 पथकांचे काम थांबले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढलं पत्र कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्ह्यातील 45 वाहनांची सेवा खंडित केली यामुळे राष्ट्रीय कार्यात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका जिल्...