Posts

Showing posts from April, 2021

Dinwarta 27-04-2021

Image
 

जळगाव जिल्ह्यात 6 मेपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

  जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 - सध्या संपुर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी त्याचप्रमाणे नागरीकांनी सण, उत्सव, थोरामोठ्यांच्या जयंती, पुण्यतिथी, धार्मिक दिंडी अशा स्वरुपांचे कार्यक्रम घेवु नये. याकरीता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 6 मे, 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) लागू करण्यात येत आहे. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  खालील कृत्यांना राहणार बंदी              शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे, अंग भाजुन टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्र किंवा शस्त्र सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. जमा...

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने शासनाचे काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित

 कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर  निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल खालीलप्रमाणे असतील व २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी          ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहील. ·       सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील. ·       वरील...

Dinwarta 20-04-2021

Image
 

ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी कामावर येऊ शकतात का? रेल्वे, बसेसने प्रवास करू शकतात का ? -           प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगेवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे याबाबतीत स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावयाचा आहे. मूव्हर्स एन्ड पॅकर्स च्या मदतीने घरसमान हलवू शकतात का ? -           अतिशय अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासन याला परवानगी देईल. मात्र सर्वसामान्यरित्या याचे उत्तर नाही असेच आहे. महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास शक्य आहे का ? -           ब्रेक दि चेनच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणत्याही योग्य व आवश्यक कारणास्तव प्रवास करू नये. तुम्ही सार्वजनिक वाहनाचा उपयोग करून एका ठिकाणाहून/ स्थानकाहून दुसरीकडे जाऊ शकता. वाईन शॉप्स आणि सिगारेट दुकाने उघडी असतील का ? -           नाही. केवळ आवश्यक गटातील दुकानच उघडी राहू शकतील लोकं  सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकलिंग करू शकतात का ? -           नाही. सिमेंट, रेडी ...

राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू ,कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दि. १३ एप्रिल २०२१ दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज *कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी* *एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार* *कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा* मुंबई, दि. १३ : - कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे  ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.  राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.    राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या क...

सुप्रीम कोर्टाचा निर्णय वैयक्तिक टीका, वैयक्तिक शिवीगाळ ,जमिन व सामाजिक वादावादी यासाठी यापुढे एट्रॉसिटी टाकता येणार नाही - सुप्रीम कोर्टाचा निकाल जोपर्यंत हेतू सिद्ध होत नाही तोपर्यंत Atrocity गून्हा दाखल करता येनारच नाही.

उच्च जातीमधील एखाद्या व्यक्तीच्या विरोधात खटला दाखल करणारी किंवा विरोध करणारी व्यक्ती ही एससी/एसटी समुदायामधील सदस्य असल्याने त्या उच्च जातीच्या व्यक्तीला त्याच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एससी/एसटी समुदायातील व्यक्तींच्या संरक्षणासाठी असणाऱ्या एससी/एसटी अ‍ॅक्टमधील व्याख्येसंदर्भातील एका महत्वपूर्ण निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे. तक्रारदार हा अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमातीमधील (एसटी) असल्याने एखाद्याविरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्या. एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने, "एससी/एसटी अधिनियमाअंतर्गत तक्रारदार हा अनुसूचित जातीचा सदस्य असल्याने गुन्हा दाखल करता येत नाही. संबंधित प्रकरणामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील व्यक्तीला त्याच्या जाती-पातीवरुन अपमानित करण्याचा हेतू नसेल तर गुन्हा दाखल करता येणार नाही," असं म्हटलं आहे. आधीच्या निकालामध्ये दिलेला निर्णय रद्द करत न्या. हेमंत गुप्ता यांनी शिव्या देणं किंवा अपशब्द वापरणे...

जिल्ह्यात 21 एप्रिलपर्यंत 37 (3) कलम जारी

 जळगाव, (जिमाका) दि. 7 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 21 एप्रिल, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Dinwarta 06-04-2021

Image
 

अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

Image
     ● ठाकरे सरकारमधील आणखी मंत्र्याने राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ● परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. ● मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी याची माहिती दिली.

देशात कोरोनाचा कहर, मागील 24 तासात 72 हजार नवे रुग्ण

Image
  देशाभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवरीनुसार मागील 24 तासात देशात तब्बल 72,330 नव्या कोरोनाबाधित रुग्नांची भर पडली आहे. ही बाब चिंता वाढवाणारी ठरत आहे. मागील 24 तासात कोरोनातून बरे झालेल्या रुग्नांची संख्या 40,382 इतकी आहे. तर कोरोनामुळे 459 रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. नव्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1,22,21,665 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1,14,74,683 लोक करोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या 5,84,055 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1,62,927 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशात कोरोना रुग्नांची वाढती संख्या पाहता कोरोना लसीकरणावर देशच्या आरोग्य आरोग्य यंत्रनेकडून आधीक भर दिला जात आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर 45 वर्षे वय असलेल्या व्यक्तींची गर्दी दिसून येत आहे.तसेच राजकीय नेते देखील लसीकरण करून घेताना दिसत आहेत.     कोविड -19 च्या साथीवर मात करण्यासा...