Posts

Showing posts from March, 2021

Dinwarta 30-03-2021

Image
 

एरंडोल नगरपरिषद क्षेत्रात 28 मार्च पर्यंत जनता कर्फ्यु

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 26-  कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधक उपययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी  एरंडोल नगरपरिषद हद्दीत 28 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत जनता कर्फ्यु पालन करण्याचे आवाहन केले असून  शहरात कडक निर्बंध  लागू केले आहेत.   या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील.  किराणे दुकाने,  इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. अपवादात्मक परिस्थीतीत रेशन दुकानाबाबत काही वेळ तहसिलदार यांनी ठरवून घ्यावी.   किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये बंद राहतील.  मान्यता प्राप्त विद्यापीठाची पुर्व नियोजित परिक्षा असल्यास त्याचे तहसिल कार्यालयाकडून पास घेवून आयोजन करता येईल. सर्व  हॉटेल/ रेस्टॉरंट  (अत्यावश्यक सेवेसाठी होम डीलाव्हरी/  पार्सल देणारे हॉटेल वगळता )  बंद राहतील.  सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल, मार्केट, बार्बर शॉप, स्पा,...

जळगाव व पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालय शनिवारी सुरू राहणार

जळगाव, दि. 26 - जळगाव शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालये व पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालय शनिवार दि. 27 मार्च, 2021 या शासकीय सुट्टीच्या दिवशी  दस्त नोंदणीसाठी सुरू राहणार आहे.   तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 2 तथा पाचोरा प्रशासकीय अधिकारी सुनील मधुकर पाटील यांनी केले आहे.

Dinwarta 23-03-2021

Image
 

Dinwarta 16-03-2021

Image
 

राज्यात लॉकडाऊन नाही तर कठोर निर्बंध करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई :  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी.वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील असे सांगतानाच,राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे,असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही.संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर ...
Image
  जळगाव जिल्ह्यात covid-19 विषाणूमुळे रुग्ण संख्या वाढत असल्याने  16 मार्च पासून असतील कडक निर्बंध…   जळगाव, (प्रतिनिधी) दि. 14 – जळगाव जिल्ह्यात covid-19 विषाणूमुळे रुग्ण संख्या वाढत असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्ग अधिक वाढ होऊ न देता उपाय योजना राबवणे आवश्यक आहे याकरता निर्बंध लागू करणे आवश्यक आहे आणि ज्याअर्थी घोषात या कार्यालयाचे आदेश दिनांक 9 मार्च 2021 व दिनांक 11 मार्च 2021 अन्वये अनुक्रमांक जळगाव शहर मनपा हद्दीत व चोपडा, चाळीसगाव नगर पालिका हद्दीत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शीथीलता देणे आवश्यक असून भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 897 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 16 मार्च 2021 पासून पुढील आदेश होई पावतो जळगाव जिल्ह्यातील खालील प्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे आदेश आज रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले.   जिल्ह्यातील निर्बंध खालील प्रमाणे -   सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्र खाजगी शिकवणी क्लासे...

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार , शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे . यामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे . तसेच सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी लादण्यात आली आहे . तरीही कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार , शनिवार आणि रविवार या तिन दिवशी जनता कर्फ्युचे  पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. ●  यानुसार जळगावात आता तीन दिवसांचा जनता कर्फ्यु असणार आहे . हा जनता कर्फ्यु 11 मार्च 2021 रोजी रात्री आठ वाजता पासून सुरुवात होऊन 15 मार्च 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहे . ● विविध संघटनेच्या माध्यमातून प्रस्तावावरून हा तीन दिवसीय जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा...

Dinwarta 09-03-2021

Image
 

वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत..

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 4 - राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या  https:www.dortexmah.gov.in  वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत देण्यात आली होती. याबाबत या उद्योगाच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने या कालावधीत वाढ करण्यात आली असुन, नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मे, 2021 पर्यत देण्यात येत आहे.  या मुदतीत जर संबंधित यंत्रमाग धारकांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जो पर्यंत ते यंत्रमाग घटक नोंदणी करीत नाहीत, तो पर्यंत बंद करण्यात येईल.  शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी, 2021 अन्वये 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना नोंदणी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारक ऑफलाईनव्दारे सादर करावयाचे अर्ज  वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवर...

जळगाव महिला वसतीगृहासंबंधीच्या घटनेत तथ्य नसल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष - गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 4 : जळगाव येथील महिला वसतीगृहासंबंधी घटनेची सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य नसल्याचा अहवाल दिला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.            गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, काल या महिला वसतीगृहाबाबत वृत्त प्रकाशित झाल्याने त्याचबरोबर विधानसभेत सदस्यांनी मुद्दा उप‍स्थित केल्यानंतर चौकशीसाठी नेमलेल्या सहा महिला अधिकाऱ्यांनी या वसतीगृहातील महिलांशी चर्चा केली. 41 साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. या वसतीगृहात 17 महिला  वास्तव्यास असून त्यांच्यासोबत महिला अधिकाऱ्यांनी चर्चा केली. महिला वसतीगृह असल्याने पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. तक्रारदार महिलेच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही, असा अहवाल या महिला अधिकाऱ्यांनी दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.             या प्रसंगी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, या वसतीगृहात पिडीत आणि घटस्फोटित महिला राहतात. त्यांच्य...
Image
  जळगाव येथील आशादीप वसतीगृह प्रकरणी होणार चौकशी – गृहमंत्री मुंबई  : जळगाव येथील आशादीप महिला वसतीगृहात मुलींना विवस्त्र अवस्थेत नाचण्यास भाग पाडल्या प्रकरणी 4 अधिका-यांची समिती नेमली जाणार असून ,त्यांच्या माध्यमातून चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. जळगाव स्थित गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी बराच गदारोळ माजल्यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली जाणार असल्याची व त्यांचा अहवाला आल्यानंतर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Dinwarta 02-03-2021

Image