जळगाव : काही महिन्यांपासून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या बदलीची जोरदार चर्चा रंगली होती. अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर त्याच्या जागेवर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पदी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अखेर प्रवीण मुंढे यांची बदली करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील दबंग कामगिरी नंतर जळगाव जिल्ह्यात त्यांची झालेली बदली निर्णायक ठरणार आहे.
प्रवीण मुंढे यांची थोडक्यात माहिती: ◆ प्रवीण मुंढे यांचे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झाले आहे.
◆मुंढे यांनी तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ, नवी मुंबई येथे पूर्ण केले आहे.
◆त्यांचा जन्म 1985 साली झाला आहे. ते मुळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आहेत.
◆ मुंढे यांनी 2015-2016 या साली नाशिक येथील कुंभमेळा मध्ये आपली मुख्य जबाबदारी पार पाडली आहे.
◆2017 साली पुण्यात वाहतूक विभागात सुध्दा जोरदार कामगिरी बजावली आहे.
◆ मुंढे हे 2012 ला आय पी एस अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.
◆मुंढे हे रत्नागिरी येथे कार्यरत होते. त्यांची बदली आता जळगाव येथे झाली आहे.
जळगाव – नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला. आत्माराम धना लोंढे असे जळगाव शहर उप विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञाचे (वायरमन) नाव आहे. जळगाव एसीबीच्या पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लाच प्रकरणातील तक्रारदार हे डॉक्टरचे वडील आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे नवीन वीज मीटर घेण्यासाठी वायरमन लोंढे यांची भेट घेत लागणाऱ्या कागदपत्रांबाबत विचारणा केली होती. वायरमन लोंढे यांनी डॉक्टरच्या वडिलांना नवीन वीज मीटर बसवण्यासाठी चार हजार रुपयाची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी वायरमन लोंढे यांना मागणी प्रमाणे चार हजार रुपये दिले होते. त्यानंतर देखील लोंढे यांनी वीज मीटर बसवून देण्याचे काम केले नाही. त्यामुळे डॉक्टरचे वडील अर्थात तक्रारदार यांनी वायरमन लोंढे यांना याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांना पुन्हा दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पुन्हा लाच देण्याची तक्रारद...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) नवी जबाबदारी मिळाली आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्या आधी टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार आणि गांगुलीचा सहकारी खेळाडू अनिल कुंबळे याने हे पद भूषवले होते. कुंबळे जवळपास नऊ वर्षे या पदावर राहिले. क्रिकेट समितीचे काम खेळाच्या अटी आणि नियमांचे निरीक्षण करणे आहे. अनिल कुंबळेने या पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता आणि त्यापेक्षा जास्त काळ ते पदावर राहू शकत नव्हेत. त्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले. गांगुली यापूर्वी आयसीसी क्रिकेट समितीमध्ये निरीक्षक पदावर होता. गांगुलीने भारतासाठी एकूण 113 कसोटी, 311 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 7212 कसोटी आणि 11363 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. गांगुलीच्या खात्यात 32 कसोटी आणि 100 एकदिवसीय विकेट्स आहेत.
जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार , शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे . यामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे . तसेच सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी लादण्यात आली आहे . तरीही कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार , शनिवार आणि रविवार या तिन दिवशी जनता कर्फ्युचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. ● यानुसार जळगावात आता तीन दिवसांचा जनता कर्फ्यु असणार आहे . हा जनता कर्फ्यु 11 मार्च 2021 रोजी रात्री आठ वाजता पासून सुरुवात होऊन 15 मार्च 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहे . ● विविध संघटनेच्या माध्यमातून प्रस्तावावरून हा तीन दिवसीय जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा...
Comments
Post a Comment