परिस्थिती पाहून लॉकडाऊनचं काय करायचं ते ठरवू: उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊनबाबत काय करायचं आहे याचा विचार परिस्थिती पाहूनच ३ मे नंतर घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मुंबई: राज्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात उद्योगधंद्यांना मुभा दिली आहे. त्याचा अहवाल रोज माझ्याकडं येत आहे. आज संध्याकाळीही मी आढावा घेणार आहे. परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनचं काय करायचं याबाबतचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Comments
Post a Comment